Skip to main content

पूर्ण शांतता........

 आज मला शांत राहायचं आहे, नाही बोलणार, ना कुठे जाणार मला शांती हवी आहे.असं करून होईल का शांत आपण, हे तर मि तुमच्यावरचं सोडते.बर शांतता म्हणजे काय? नेमक हवं तरी काय?आवाज नष्ट झाल्यानंतर असलेली ती शांतता, सरळ सोप्या भाषेत एवढेच, माणूस वरुन कितीही शांत असल्या सारखं वागत असेल तरी तो मनातून अशांतच असतो. जी माणसं समाधानी असेल ती माणसं सुखी माणसं आहे असं म्हणता येईल,म्हणजेच मि याला शांत मनुष्य समजणार, तृप्त झालेला.आता त्याला काहीच नको, पण अशी शांतता प्राप्त करण्यासाठी आपल्याला सतत स्वतःशी लढत राहावं लागणार आहे. मग बघा कोण जिकंणार तर तुमचा स्वार्थ कि तुमची समाधानी वृत्ती,

      मला अजूनही माझ्या गुरुजींची एक गोष्ट आठवते, त्यांनी म्हटलं होत कि, पूर्ण शांतता ही स्मशानाच्या पायरीवर जाऊन मिळते. मनुष्य जेव्हा सरणार रचवला जातो. तेव्हा तो पूर्ण शांततेत विलीन होतो. पण माझ्या मते, तो तर आपला शेवट ठरतो ना. तेव्हा तर शांतता मिळनारचन,पण जो पर्यंत आपलं आयुष्य आहे तो पर्यंतच्या काळात आपण शांतता म्हणजेच समाधान नाही मिळवू शकत का? म्हटलं तर आपल्याला जे हवं जे आपल्याला ऐकायचं आहे तेच आपल्याला मिळाल आणि ऐकलं. तर आपण काही वेळेसाठी आपल्याला शांतता मिळते,आणि या उलट झालं तर मग आपण चिडून उठतो मग तर शांतता दूरच............

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शांतीचा शून्यबिंदू

         अंतर्मनाच्या ओलसर पायवाटेवरून..      मी त्या असीम शांतीच्या शोधात आहे. अशी शांती, जिला शब्द नाहीत, रूप नाही, ओळख नाही. जिथे मनाचं नितळपणही गहिरं वाटू लागतं आणि भावना सुद्धा एका अपरिचित उंबरठ्यावरच थबकतात. माझ्या आत जे चाललंय, ते या बाह्य जगाशी काहीच साम्य ठेवत नाही. मन म्हणतं, "थांब", पण आत्मा मात्र चालत राहतो. कारण ही चाल "कुठे जाण्याची" नाही. ही चाल आहे, स्वतःपासून दूर जाण्याची.      सततच्या आशा, अपेक्षा, भावनिक ओढी यामध्ये आपण शांतीचा उल्लेख करतो. पण खरंच, ती या सगळ्यांमध्येच आहे का? की या सगळ्यांपासून "मुक्त" झाल्यावर? जसं झाडावर पानं असतात, पण खऱ्या शांततेसाठी झाडावर काहीही नसलं तरी चालतं, तशीच ही अवस्था. ही शांती म्हणजे नकार नाही, हे काही टाळणं नाही; ही एक अंतःस्वरूपातील निर्मोही ओळख आहे,स्वतःच्याही पलीकडची. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे काळजात खोल जाऊन भिडतो.. "आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्। तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥" (गीता – अध्याय २, श्लोक ७०) अर्थ असा — जसा समुद्र ...

तू पारिजात..भाग ३

तू पारिजात..  श्री कृष्णाच्या अंगणात उमलणारी, रुक्मिणीच्या  संसारात हरवणारी, सत्यभामेच्या अहंकारात जळणारी, आणि तरीही, फक्त त्याच्यासाठीच फुलणारी... मी? मी कदाचित कृष्णाचा रथ असावा, तुला उचलून न्यायला धावणारा, की मीच ती बाग, जिथं तू उगवायचीस, आणि मी फक्त वाट पाहायचो— तू केव्हा पडशील आणि मी तुला उचलून धरिन… तू सुगंधाचा श्वास, आणि मी तो वारा, तू अलगद मिटणारी पापडी, आणि मी तुला हलवणारा स्पर्श... पण अखेरचं सत्य काय माहितेय का? तू जेव्हा पहाटे गळून पडतेस, तेव्हा तुझा गंध तरी कुणासाठी उरत असतो? मी उचलायच्या आतच, तू मातीत मिसळून गेलेली असतेस…!

होळी

 धगधगती ज्वाला उठती, प्रज्वलित त्या फुलत्या, दहन होई सर्व दोष, हर्ष सरे दुःखाच्या! पंचमहाभूते नाचती, मंत्र गजर तो दाटला, रंगांच्या त्या वर्षावाने, आनंद सारा सांडला! धूळवडीच्या सकळ क्षणी, रंग जाहले इंद्रधनू, गुलालाच्या त्या स्पर्शाने, विरघळले सर्व मनू! भाव स्नेह अन् प्रेम गहिरे, हास्य हास्य लय दाटे, जग उजळे रंगोत्सवाने, सुख सिंधू मनी लाटे! शिशिर गेला, वसंत हसला, फुलांवरी ती मोहरली, होळीच्या त्या ज्वाळेमध्ये, काळोखी सारी हरली!