Skip to main content

पूर्ण शांतता........

 आज मला शांत राहायचं आहे, नाही बोलणार, ना कुठे जाणार मला शांती हवी आहे.असं करून होईल का शांत आपण, हे तर मि तुमच्यावरचं सोडते.बर शांतता म्हणजे काय? नेमक हवं तरी काय?आवाज नष्ट झाल्यानंतर असलेली ती शांतता, सरळ सोप्या भाषेत एवढेच, माणूस वरुन कितीही शांत असल्या सारखं वागत असेल तरी तो मनातून अशांतच असतो. जी माणसं समाधानी असेल ती माणसं सुखी माणसं आहे असं म्हणता येईल,म्हणजेच मि याला शांत मनुष्य समजणार, तृप्त झालेला.आता त्याला काहीच नको, पण अशी शांतता प्राप्त करण्यासाठी आपल्याला सतत स्वतःशी लढत राहावं लागणार आहे. मग बघा कोण जिकंणार तर तुमचा स्वार्थ कि तुमची समाधानी वृत्ती,

      मला अजूनही माझ्या गुरुजींची एक गोष्ट आठवते, त्यांनी म्हटलं होत कि, पूर्ण शांतता ही स्मशानाच्या पायरीवर जाऊन मिळते. मनुष्य जेव्हा सरणार रचवला जातो. तेव्हा तो पूर्ण शांततेत विलीन होतो. पण माझ्या मते, तो तर आपला शेवट ठरतो ना. तेव्हा तर शांतता मिळनारचन,पण जो पर्यंत आपलं आयुष्य आहे तो पर्यंतच्या काळात आपण शांतता म्हणजेच समाधान नाही मिळवू शकत का? म्हटलं तर आपल्याला जे हवं जे आपल्याला ऐकायचं आहे तेच आपल्याला मिळाल आणि ऐकलं. तर आपण काही वेळेसाठी आपल्याला शांतता मिळते,आणि या उलट झालं तर मग आपण चिडून उठतो मग तर शांतता दूरच............

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

तु

 तुझ्या आठवांनी झोप चोरली, ही रात्र का संपत नाही, मी मनात बोलतो तुझ्याशी, पण तुझं उत्तर का येत नाही. तुझी चाहूल लागते, आणि हवा गोंजारते काही, मी डोळे मिटतो सावकाश, पण स्वप्नात तू दिसतच नाही. तुझं नाव लिहायचं, हात थरथरतो का कुणास ठाऊक, मी आकाशात शोधतो तुला, पण तारा सुद्धा ओळखत नाही. तुझ्या सुगंधात हरवायचं, हे मन रोज ठरवतं, पण दरवेळी त्या वाऱ्याला तुझं ठिकाण सापडतच नाही. तुझं नाव लिहिलं तरी, शब्द का जळत जातात, मी मनात ओतलं पाणी, ते डोळ्यातून का वाहतं. हे असं चालूच राहिलं तर, शब्दही दमून जातील, पण मी तुझीच वाट पाहत कविताच होत जाईन.

सखे साजणी

  सखे साजणी, तू सवय झाली, उगाच मनास भुलवू नको, गेल्या गगनी या सावल्या जरी, पावसास वेडावू नको.. तुझ्या सहवासी मंद वारे, पारिजातही फुलला गडे, स्मरते मजला बोल तुझे ते, पायवाटही खुलली गडे! सांज सभोती झुळूक हलकी, तुझीच चाहूल लागली जशी, स्वप्नांमध्येही तूच यावी, सावली झालीस जशी! मज दूर जाऊ नकोस गं आता, सोसत नाही विरहाचे वारे, सखे साजणी, तू सवय झाली, राहशील ना तू माझ्याच द्वारे?

....

       तुझ्या निरागस हसण्यात मी भान हरपून बसतो,  तुझ्या पाऊलखुणात मी  हळवीशी वाट शोधत असतो. तुझा शब्द छोटा का होईना,  माझ्या हृदयात घर करून असतो,  प्रयत्न का होईना, पण तुझे इवलेसे मन जपत असतो. निशब्द असलो तरी, तुझ्या अखंड बडबडीत शब्द सुचवत असतो,  अबोल भावना का होईना, तुझ्या शब्दात जाणवत असतो....