Skip to main content

तु

 तुझ्या आठवांनी झोप चोरली,

ही रात्र का संपत नाही,

मी मनात बोलतो तुझ्याशी,

पण तुझं उत्तर का येत नाही.


तुझी चाहूल लागते,

आणि हवा गोंजारते काही,

मी डोळे मिटतो सावकाश,

पण स्वप्नात तू दिसतच नाही.


तुझं नाव लिहायचं,

हात थरथरतो का कुणास ठाऊक,

मी आकाशात शोधतो तुला,

पण तारा सुद्धा ओळखत नाही.


तुझ्या सुगंधात हरवायचं,

हे मन रोज ठरवतं,

पण दरवेळी त्या वाऱ्याला

तुझं ठिकाण सापडतच नाही.


तुझं नाव लिहिलं तरी,

शब्द का जळत जातात,

मी मनात ओतलं पाणी,

ते डोळ्यातून का वाहतं.


हे असं चालूच राहिलं तर,

शब्दही दमून जातील,

पण मी तुझीच वाट पाहत

कविताच होत जाईन.






Comments

Popular posts from this blog

तू पारिजात..भाग ३

तू पारिजात..  श्री कृष्णाच्या अंगणात उमलणारी, रुक्मिणीच्या  संसारात हरवणारी, सत्यभामेच्या अहंकारात जळणारी, आणि तरीही, फक्त त्याच्यासाठीच फुलणारी... मी? मी कदाचित कृष्णाचा रथ असावा, तुला उचलून न्यायला धावणारा, की मीच ती बाग, जिथं तू उगवायचीस, आणि मी फक्त वाट पाहायचो— तू केव्हा पडशील आणि मी तुला उचलून धरिन… तू सुगंधाचा श्वास, आणि मी तो वारा, तू अलगद मिटणारी पापडी, आणि मी तुला हलवणारा स्पर्श... पण अखेरचं सत्य काय माहितेय का? तू जेव्हा पहाटे गळून पडतेस, तेव्हा तुझा गंध तरी कुणासाठी उरत असतो? मी उचलायच्या आतच, तू मातीत मिसळून गेलेली असतेस…!

सखे साजणी

  सखे साजणी, तू सवय झाली, उगाच मनास भुलवू नको, गेल्या गगनी या सावल्या जरी, पावसास वेडावू नको.. तुझ्या सहवासी मंद वारे, पारिजातही फुलला गडे, स्मरते मजला बोल तुझे ते, पायवाटही खुलली गडे! सांज सभोती झुळूक हलकी, तुझीच चाहूल लागली जशी, स्वप्नांमध्येही तूच यावी, सावली झालीस जशी! मज दूर जाऊ नकोस गं आता, सोसत नाही विरहाचे वारे, सखे साजणी, तू सवय झाली, राहशील ना तू माझ्याच द्वारे?