Skip to main content

तू पारिजात..भाग ३

तू पारिजात.. 

श्री कृष्णाच्या अंगणात उमलणारी,

रुक्मिणीच्या  संसारात हरवणारी,

सत्यभामेच्या अहंकारात जळणारी,

आणि तरीही, फक्त त्याच्यासाठीच फुलणारी...


मी?

मी कदाचित कृष्णाचा रथ असावा,

तुला उचलून न्यायला धावणारा,

की मीच ती बाग, जिथं तू उगवायचीस,

आणि मी फक्त वाट पाहायचो—

तू केव्हा पडशील आणि मी तुला उचलून धरिन…


तू सुगंधाचा श्वास,

आणि मी तो वारा,

तू अलगद मिटणारी पापडी,

आणि मी तुला हलवणारा स्पर्श...


पण अखेरचं सत्य काय माहितेय का?

तू जेव्हा पहाटे गळून पडतेस,

तेव्हा तुझा गंध तरी कुणासाठी उरत असतो?

मी उचलायच्या आतच,

तू मातीत मिसळून गेलेली असतेस…!


Comments

Popular posts from this blog

तु

 तुझ्या आठवांनी झोप चोरली, ही रात्र का संपत नाही, मी मनात बोलतो तुझ्याशी, पण तुझं उत्तर का येत नाही. तुझी चाहूल लागते, आणि हवा गोंजारते काही, मी डोळे मिटतो सावकाश, पण स्वप्नात तू दिसतच नाही. तुझं नाव लिहायचं, हात थरथरतो का कुणास ठाऊक, मी आकाशात शोधतो तुला, पण तारा सुद्धा ओळखत नाही. तुझ्या सुगंधात हरवायचं, हे मन रोज ठरवतं, पण दरवेळी त्या वाऱ्याला तुझं ठिकाण सापडतच नाही. तुझं नाव लिहिलं तरी, शब्द का जळत जातात, मी मनात ओतलं पाणी, ते डोळ्यातून का वाहतं. हे असं चालूच राहिलं तर, शब्दही दमून जातील, पण मी तुझीच वाट पाहत कविताच होत जाईन.

शांतीचा शून्यबिंदू

         अंतर्मनाच्या ओलसर पायवाटेवरून..      मी त्या असीम शांतीच्या शोधात आहे. अशी शांती, जिला शब्द नाहीत, रूप नाही, ओळख नाही. जिथे मनाचं नितळपणही गहिरं वाटू लागतं आणि भावना सुद्धा एका अपरिचित उंबरठ्यावरच थबकतात. माझ्या आत जे चाललंय, ते या बाह्य जगाशी काहीच साम्य ठेवत नाही. मन म्हणतं, "थांब", पण आत्मा मात्र चालत राहतो. कारण ही चाल "कुठे जाण्याची" नाही. ही चाल आहे, स्वतःपासून दूर जाण्याची.      सततच्या आशा, अपेक्षा, भावनिक ओढी यामध्ये आपण शांतीचा उल्लेख करतो. पण खरंच, ती या सगळ्यांमध्येच आहे का? की या सगळ्यांपासून "मुक्त" झाल्यावर? जसं झाडावर पानं असतात, पण खऱ्या शांततेसाठी झाडावर काहीही नसलं तरी चालतं, तशीच ही अवस्था. ही शांती म्हणजे नकार नाही, हे काही टाळणं नाही; ही एक अंतःस्वरूपातील निर्मोही ओळख आहे,स्वतःच्याही पलीकडची. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे काळजात खोल जाऊन भिडतो.. "आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्। तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥" (गीता – अध्याय २, श्लोक ७०) अर्थ असा — जसा समुद्र ...