पुन्हा काही प्रश्न मनामध्ये विचारांच वादळ निर्माण करते, वास्तव मात्र कल्पनेतले हसरे चेहरे हरते. कळते मात्र सर्व पण वळत काहीच नाही, या जगात माझ्या इतकं खूळ कोणीच नाही. प्रश्नांची उत्तरे माहीत असूनही उत्तरे शोधावे, वास्तवाची जाणीव असली तरीही कल्पनेतच जगावे. काय म्हणावं या खुळ्या पणाला प्रश्न हाच पडते, काहीही न समजता पुन्हा पुन्हा भावनांचा हाच खेळ मांडते..
हवी सोबत सोबतीला मनीषा अशी रुजली, न उमगले चंद्रकोरी सोबत काजव्यांची मिळाली....