Skip to main content

वेगळेपण


 बोलावे एकदा या निशब्द मनाने

उधवस्त करावे या वादळाने

जीवनात गुंतलेला गुंता तोडावा शब्दआघाताने

मावळून घ्यावे काळीज माझे या क्षितिजाणे

अपेक्षाचा जाळ  करावा या काळोखाने....

                         कधी कधी हे समजणे खूप अवघड होते कि आपल्याला काय झाले आहे,आणि  जे झाले आहेत ते लवकरात लवकर कळले तर फारच चांगले,सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात, त्यांच्यात आचार विचार, स्वभाव, आवडी निवडी, राहणी, वागणे अश्या कित्येक बाबतीत एक व्यक्ती इतर व्यक्ती पेक्षा वेगळी असते, आणि हे वेगळेपण समजून घेणे गरजेचं असते,पण वेगळेपण समजून घेणे हे सहजासहज सोपे नसते, आणि ते वेगळे पण समजुनही घेतले तरी ते स्वीकारणे फार अवघड असते.

                     म्हणून ज्या दिशेने या समाजाचा प्रवाह वाहत जातो आपण त्यात सामावून वाहत जात असतो, या प्रवाहत वाहत असताना आपल्यात असणार वेगळेपण आपल्या आड येते , बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध असतात आणि मनाविरुद्ध जाण आपल्याला मान्य नसते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या मनात आपण  साठून घेत असतो, त्या विचाराची मनात सतत घुटमळ होत राहते, आतून आपल्यात पोखळी  निर्माण करते.

               मनात रुजवून ठेवेल्या गोष्टीची  मनात भीती निर्माण होते,सहाजिकच आहे,आणि वेगळेपण स्वीकारणे आणखी कठीणच वाटते, बऱ्याच गोष्टी गुपित बनून राहतात, वाट तिथेच थांबते,आणि आपण फक्त चालत राहतो हवे  तेवढे प्रश्न घेऊन, हे माझ्या सोबतच का होते?यात माझी चूक आहे का?हे का होत आहे? कशासाठी? आणि कश्यामुळे?

                                खरंतर यातून बाहेर निघने सोपे नसते, पण कुटुंबाची सोबत असेल तर एवढे कठीणही नसते, थोडं समजून, थोडं समजावून घेतल्या जाते, त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्यांना समजून घ्यावं, आयुष्याचा एक टप्पा गाठला असेल तरी, पुढे जाण्याची प्रेरणा देऊन त्याची वाट मोकळी करावी....


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शांतीचा शून्यबिंदू

         अंतर्मनाच्या ओलसर पायवाटेवरून..      मी त्या असीम शांतीच्या शोधात आहे. अशी शांती, जिला शब्द नाहीत, रूप नाही, ओळख नाही. जिथे मनाचं नितळपणही गहिरं वाटू लागतं आणि भावना सुद्धा एका अपरिचित उंबरठ्यावरच थबकतात. माझ्या आत जे चाललंय, ते या बाह्य जगाशी काहीच साम्य ठेवत नाही. मन म्हणतं, "थांब", पण आत्मा मात्र चालत राहतो. कारण ही चाल "कुठे जाण्याची" नाही. ही चाल आहे, स्वतःपासून दूर जाण्याची.      सततच्या आशा, अपेक्षा, भावनिक ओढी यामध्ये आपण शांतीचा उल्लेख करतो. पण खरंच, ती या सगळ्यांमध्येच आहे का? की या सगळ्यांपासून "मुक्त" झाल्यावर? जसं झाडावर पानं असतात, पण खऱ्या शांततेसाठी झाडावर काहीही नसलं तरी चालतं, तशीच ही अवस्था. ही शांती म्हणजे नकार नाही, हे काही टाळणं नाही; ही एक अंतःस्वरूपातील निर्मोही ओळख आहे,स्वतःच्याही पलीकडची. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे काळजात खोल जाऊन भिडतो.. "आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्। तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥" (गीता – अध्याय २, श्लोक ७०) अर्थ असा — जसा समुद्र ...

तू पारिजात..भाग ३

तू पारिजात..  श्री कृष्णाच्या अंगणात उमलणारी, रुक्मिणीच्या  संसारात हरवणारी, सत्यभामेच्या अहंकारात जळणारी, आणि तरीही, फक्त त्याच्यासाठीच फुलणारी... मी? मी कदाचित कृष्णाचा रथ असावा, तुला उचलून न्यायला धावणारा, की मीच ती बाग, जिथं तू उगवायचीस, आणि मी फक्त वाट पाहायचो— तू केव्हा पडशील आणि मी तुला उचलून धरिन… तू सुगंधाचा श्वास, आणि मी तो वारा, तू अलगद मिटणारी पापडी, आणि मी तुला हलवणारा स्पर्श... पण अखेरचं सत्य काय माहितेय का? तू जेव्हा पहाटे गळून पडतेस, तेव्हा तुझा गंध तरी कुणासाठी उरत असतो? मी उचलायच्या आतच, तू मातीत मिसळून गेलेली असतेस…!

होळी

 धगधगती ज्वाला उठती, प्रज्वलित त्या फुलत्या, दहन होई सर्व दोष, हर्ष सरे दुःखाच्या! पंचमहाभूते नाचती, मंत्र गजर तो दाटला, रंगांच्या त्या वर्षावाने, आनंद सारा सांडला! धूळवडीच्या सकळ क्षणी, रंग जाहले इंद्रधनू, गुलालाच्या त्या स्पर्शाने, विरघळले सर्व मनू! भाव स्नेह अन् प्रेम गहिरे, हास्य हास्य लय दाटे, जग उजळे रंगोत्सवाने, सुख सिंधू मनी लाटे! शिशिर गेला, वसंत हसला, फुलांवरी ती मोहरली, होळीच्या त्या ज्वाळेमध्ये, काळोखी सारी हरली!