Skip to main content

वेगळेपण


 बोलावे एकदा या निशब्द मनाने

उधवस्त करावे या वादळाने

जीवनात गुंतलेला गुंता तोडावा शब्दआघाताने

मावळून घ्यावे काळीज माझे या क्षितिजाणे

अपेक्षाचा जाळ  करावा या काळोखाने....

                         कधी कधी हे समजणे खूप अवघड होते कि आपल्याला काय झाले आहे,आणि  जे झाले आहेत ते लवकरात लवकर कळले तर फारच चांगले,सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात, त्यांच्यात आचार विचार, स्वभाव, आवडी निवडी, राहणी, वागणे अश्या कित्येक बाबतीत एक व्यक्ती इतर व्यक्ती पेक्षा वेगळी असते, आणि हे वेगळेपण समजून घेणे गरजेचं असते,पण वेगळेपण समजून घेणे हे सहजासहज सोपे नसते, आणि ते वेगळे पण समजुनही घेतले तरी ते स्वीकारणे फार अवघड असते.

                     म्हणून ज्या दिशेने या समाजाचा प्रवाह वाहत जातो आपण त्यात सामावून वाहत जात असतो, या प्रवाहत वाहत असताना आपल्यात असणार वेगळेपण आपल्या आड येते , बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध असतात आणि मनाविरुद्ध जाण आपल्याला मान्य नसते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या मनात आपण  साठून घेत असतो, त्या विचाराची मनात सतत घुटमळ होत राहते, आतून आपल्यात पोखळी  निर्माण करते.

               मनात रुजवून ठेवेल्या गोष्टीची  मनात भीती निर्माण होते,सहाजिकच आहे,आणि वेगळेपण स्वीकारणे आणखी कठीणच वाटते, बऱ्याच गोष्टी गुपित बनून राहतात, वाट तिथेच थांबते,आणि आपण फक्त चालत राहतो हवे  तेवढे प्रश्न घेऊन, हे माझ्या सोबतच का होते?यात माझी चूक आहे का?हे का होत आहे? कशासाठी? आणि कश्यामुळे?

                                खरंतर यातून बाहेर निघने सोपे नसते, पण कुटुंबाची सोबत असेल तर एवढे कठीणही नसते, थोडं समजून, थोडं समजावून घेतल्या जाते, त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्यांना समजून घ्यावं, आयुष्याचा एक टप्पा गाठला असेल तरी, पुढे जाण्याची प्रेरणा देऊन त्याची वाट मोकळी करावी....


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

तु

 तुझ्या आठवांनी झोप चोरली, ही रात्र का संपत नाही, मी मनात बोलतो तुझ्याशी, पण तुझं उत्तर का येत नाही. तुझी चाहूल लागते, आणि हवा गोंजारते काही, मी डोळे मिटतो सावकाश, पण स्वप्नात तू दिसतच नाही. तुझं नाव लिहायचं, हात थरथरतो का कुणास ठाऊक, मी आकाशात शोधतो तुला, पण तारा सुद्धा ओळखत नाही. तुझ्या सुगंधात हरवायचं, हे मन रोज ठरवतं, पण दरवेळी त्या वाऱ्याला तुझं ठिकाण सापडतच नाही. तुझं नाव लिहिलं तरी, शब्द का जळत जातात, मी मनात ओतलं पाणी, ते डोळ्यातून का वाहतं. हे असं चालूच राहिलं तर, शब्दही दमून जातील, पण मी तुझीच वाट पाहत कविताच होत जाईन.

सखे साजणी

  सखे साजणी, तू सवय झाली, उगाच मनास भुलवू नको, गेल्या गगनी या सावल्या जरी, पावसास वेडावू नको.. तुझ्या सहवासी मंद वारे, पारिजातही फुलला गडे, स्मरते मजला बोल तुझे ते, पायवाटही खुलली गडे! सांज सभोती झुळूक हलकी, तुझीच चाहूल लागली जशी, स्वप्नांमध्येही तूच यावी, सावली झालीस जशी! मज दूर जाऊ नकोस गं आता, सोसत नाही विरहाचे वारे, सखे साजणी, तू सवय झाली, राहशील ना तू माझ्याच द्वारे?

....

       तुझ्या निरागस हसण्यात मी भान हरपून बसतो,  तुझ्या पाऊलखुणात मी  हळवीशी वाट शोधत असतो. तुझा शब्द छोटा का होईना,  माझ्या हृदयात घर करून असतो,  प्रयत्न का होईना, पण तुझे इवलेसे मन जपत असतो. निशब्द असलो तरी, तुझ्या अखंड बडबडीत शब्द सुचवत असतो,  अबोल भावना का होईना, तुझ्या शब्दात जाणवत असतो....