Skip to main content

`ती´ चा प्रसंग


        सहजच एका दिवशी बाहेर जाण्याचा योग आला. तस मला भाऊगर्दीत जाण्यास फारस काही आवडत नाही, पण या कोरोना महामारी मुळे घरच्या घरी बसून खूप त्रासले होते, आणि ज्या स्थळी जायचे होते तेथील निसर्ग रम्य वातावरणाने भरलेला होता. मनात लोभ भरला निसर्गाचा आस्वाद घेण्याचा, आणि त्यात आग्रह सुद्धा.                                                             
             कार्यस्थळी पोहचले, गर्दी पाहून थोडं घाबरल्या सारखं झालं. मला गर्दी ची भीती नाही लागत पण आपल्या नातेवाईकांची गर्दी म्हटलं कि, होतेच ते.त्यांच्याशी बोलण भेटणं सुरु झालं, त्यांच्यात बोलण यात माझा रस नव्हता. मला फक्त माझी उपस्थिती दर्शवाची होती आणि तेथून लगेच निसर्गसान्नीध्यात, पण माझी सुटका होने थोडे कठीनच वाटतं होते,मी इकडे तिकडे पाहले आणि हॉलच्या एका कोपऱ्यात जाऊन बसले, तरीही नातेवाईक या जाळ्यात मी अडकले  होते, नशीब माझं दुसरं काय म्हणावं विचार करून काय निघाले आणि घडले काय, संतापुन तेथेच बसले राहले मी,इकडे तिकडे पाहत असताना अचानक ती सोमोर आली साधारण कपडे छानसी साडी घालून होती,तिथे दागिना्यांनी मळळेल्या स्त्रियात ती एकटीच साधी आणि देखणी दिसत होती  ,फोटो काढण्यासाठी ती स्टेज च्या कोपऱ्यात उभी होती स्टेज वरील गर्दीत ती दबलेली होती, किंवा महागडी वस्त्र आणि दागिना्यांनी तिच्या साधेपणाला तिथे जागाच नव्हती दिली, असं म्हटलं तरी चालेल.माझी मात्र बाहेर जाण्याची तळमळ संपली,ती सगळ्यांशी हसत बोलत होती त्यामुळे तिचे सोंदर्य आणखी निखरत होत,पण त्या स्त्रीयांच्या  घेऱ्यात तिच्याबद्दल कुजबुज सुरु होती, टीका करणे सुरु होते, तिला सुद्धा माहित होते आपल्या साधेपणाला इथे जागा नाही म्हणून, ती घाबरलेली होती, पण मनमोकळेपणाने सर्वांशी बोलत होती, मी तुम्हाला विचारते खरच साजशृंगार,दागिने, महागडे वस्त्र यांच्या सोमोर साधेपणाच्या गोडवा हा नकोसा असतो का?                          
                   निरागस होती ती,तिचा चांगुलपणा तिथे कोणालाही नको होता, विचारात गुंतलेलि मी सहज बाहेर निघून आलि, रात्रीचे आठ वाजले होते, पौर्णिमा होती त्यामुळे स्वच्छ चंद्रप्रकाश पडलेला होता,आणि त्यात थंडीही. मी चालत चालत थोडे हॉल पासून थोडे दूर निघाले, मला दुरवर शेकोटी पेटलेली दिसली थंडी खूप होती म्हणून मी तेथे गेलि,एक पूर्ण कुटुंब त्या शेकोटी भोवती बसलेल होत,आणि त्या कुटूंबातील मुलेमुली, खेळत होते किती तरी वेळ मी त्यांच्या कडे टक लावून पाहत होते, किती मुक्त निवांत जीवन जगत होते ते,कोणत्याही बंधनात न अडकता , छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद साजरा करत होते,त्यांच्या निष्पाप भावनांचा निरागसपणाने माझ्या मनाला मोकडे केले होते, कार्यक्रम संपला होता, दादा माझ्याच येण्याची वाट पाहत होता, कारण मी त्याच्या सोबत घराकडे  जात होते, आम्ही जायला निघालो,                                                                                                  
                      चंद्राच्या प्रकाशात सगळं काही उजळून निघालं होत,तिचा साधेपणा आणि निरागसपणा पासून अगोदरच  प्रभावीत झालेलि मी आणखीच प्रभावीत झाले,बदल हा शाश्वत सत्य आहे, पण बदल कश्यात घडवायच हे आपल्याला ठरवायचे आहे,लोक बदलली खरी पण त्याचे विचार अजूनही मळलेले आहेत,आज जे मी पाहिलं त्यामुळे माझ्या विचारांची दिशाच बदलून गेली होती.आणि  कोनाकडे कस पाहायचं याबद्दल सगळ्याचा दुष्टीकोन हा वेगळाच असतो, असं मनाला समजूण पटवून दिल,आणि डोळे मिटून मन शांत केले..

Comments

Popular posts from this blog

शांतीचा शून्यबिंदू

         अंतर्मनाच्या ओलसर पायवाटेवरून..      मी त्या असीम शांतीच्या शोधात आहे. अशी शांती, जिला शब्द नाहीत, रूप नाही, ओळख नाही. जिथे मनाचं नितळपणही गहिरं वाटू लागतं आणि भावना सुद्धा एका अपरिचित उंबरठ्यावरच थबकतात. माझ्या आत जे चाललंय, ते या बाह्य जगाशी काहीच साम्य ठेवत नाही. मन म्हणतं, "थांब", पण आत्मा मात्र चालत राहतो. कारण ही चाल "कुठे जाण्याची" नाही. ही चाल आहे, स्वतःपासून दूर जाण्याची.      सततच्या आशा, अपेक्षा, भावनिक ओढी यामध्ये आपण शांतीचा उल्लेख करतो. पण खरंच, ती या सगळ्यांमध्येच आहे का? की या सगळ्यांपासून "मुक्त" झाल्यावर? जसं झाडावर पानं असतात, पण खऱ्या शांततेसाठी झाडावर काहीही नसलं तरी चालतं, तशीच ही अवस्था. ही शांती म्हणजे नकार नाही, हे काही टाळणं नाही; ही एक अंतःस्वरूपातील निर्मोही ओळख आहे,स्वतःच्याही पलीकडची. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे काळजात खोल जाऊन भिडतो.. "आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्। तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥" (गीता – अध्याय २, श्लोक ७०) अर्थ असा — जसा समुद्र ...

तू पारिजात..भाग ३

तू पारिजात..  श्री कृष्णाच्या अंगणात उमलणारी, रुक्मिणीच्या  संसारात हरवणारी, सत्यभामेच्या अहंकारात जळणारी, आणि तरीही, फक्त त्याच्यासाठीच फुलणारी... मी? मी कदाचित कृष्णाचा रथ असावा, तुला उचलून न्यायला धावणारा, की मीच ती बाग, जिथं तू उगवायचीस, आणि मी फक्त वाट पाहायचो— तू केव्हा पडशील आणि मी तुला उचलून धरिन… तू सुगंधाचा श्वास, आणि मी तो वारा, तू अलगद मिटणारी पापडी, आणि मी तुला हलवणारा स्पर्श... पण अखेरचं सत्य काय माहितेय का? तू जेव्हा पहाटे गळून पडतेस, तेव्हा तुझा गंध तरी कुणासाठी उरत असतो? मी उचलायच्या आतच, तू मातीत मिसळून गेलेली असतेस…!

होळी

 धगधगती ज्वाला उठती, प्रज्वलित त्या फुलत्या, दहन होई सर्व दोष, हर्ष सरे दुःखाच्या! पंचमहाभूते नाचती, मंत्र गजर तो दाटला, रंगांच्या त्या वर्षावाने, आनंद सारा सांडला! धूळवडीच्या सकळ क्षणी, रंग जाहले इंद्रधनू, गुलालाच्या त्या स्पर्शाने, विरघळले सर्व मनू! भाव स्नेह अन् प्रेम गहिरे, हास्य हास्य लय दाटे, जग उजळे रंगोत्सवाने, सुख सिंधू मनी लाटे! शिशिर गेला, वसंत हसला, फुलांवरी ती मोहरली, होळीच्या त्या ज्वाळेमध्ये, काळोखी सारी हरली!