Skip to main content

एकटेपणा

 

                  ऐकला चलो रे............... असं म्हणायला काही नाही वाटतं.कारण एकटेपणा हा स्वतःशी स्वतःच नातं घट्ट करणारा असतो,असं आपण म्हणतो.पण एकटेपणा हा खूप भयावक असते, ना डोळ्याला झोप ना मनाला चेन, नाही  उ्सुकता. असते तर फक्त निराशा, इच्छेने भरलेला भावुक पुतळा.

              गोंधळ, कल्ला ऐकून चिडचिड होत असली तर, आपण वैतागून जातो. असं वाटते एकांतात कुठेतरी निघून जावं, दूरदूर पर्यंत आपल्या जवड कोणी दिसायलाच नको. पण एकांत हा एकटेपणा नसतो, एकांत हा आपल्याला काही वेळे पर्यंतच हवा असतो. मग तो नकोसा होतो.पण एकांत हा वेळेपूरता मर्यादित नसेल तर त्याच रूपांतर एकटेपणात होते.

          लहानपणी सुद्धा आपल्या सोबत कोणी ना कोणी खेळायला हवं असत. आपले आईवडील किंवा आजीआजोबा असतातच त्यानंतर थोडे मोठे झालो कि शेजारचे मित्रमैत्रीनि सोबत खेळतो. मगतर शाळा, कॉलेज मध्ये आपली मैत्री इतरांशी होते. म्हणजेच लहानपणा पासून आपण एकटे राहणं टाळतो. दुःखात रडायला कुणाचा खांदा मिळतोच,खचलेल्या, भयावक झालेल्या मनाला  कुणी तरी उभारी देतेच कारण आपण स्वतःला नातं म्हणव की कुटूंबात अडकवून घेतो. काहीही नसेल सगेसोयरे नसेल तरीही माणसं कुत्र, मांजरी पाळतातच त्यांच्या सोबत आनंद वाटतात,  पण ऐकटेपणा टाळतात.

               लहानपणा पासून एकटेपणाची सवय नसते म्हणून आपण एकटेपणाला भितो. सहाजिकच आहे..आणि हो कुटूंबव्यवस्था हा एकटेपणावर एक छानसा उपाय ठरतो.असं मला वाटते. आणि एकटेपणावर उपाय शोधायचा म्हणलं तर एकमेव उपाय म्हणजे कोणाची तरी सोबत. बघा, एकटेपणा म्हटलं कि माझ्या डोळ्यासोमोर  चित्रस उभ राहत एकं रखरखीत वाळवंट!नुसता एकच आवाज एकच दृश्य दुरदूरपर्यंत कोणी नाही फक्त मि आणि माझी सावली थकलेली, भिलेली,

                        खरच एकटेपणा हा कोणाच्या वाटेला नको यायला. पण असे असते का सगळे सारखेच अं हं  कोणाच्या ना कोणाच्या वाटेला हे वाळवंट येतेच. आणि एकटेपणाची जखम घेऊनजगणारी माणसं पाहिली कि मला अश्वत्थामाची आठवण येते....

                                      शेवटी असे म्हणावे वाटते कि, ह्या घराच्याच्या चार भिंती एक मि आणि बाहेरून येणारा आवाज यात काय संवाद होणार?............. जाऊदे होतील सवय या एकटेपणाची, नाहीतरी माझ्या जवड दुसरा उपाय तरी काय असे म्हणून एकटेपण जगले जाते..................................

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शांतीचा शून्यबिंदू

         अंतर्मनाच्या ओलसर पायवाटेवरून..      मी त्या असीम शांतीच्या शोधात आहे. अशी शांती, जिला शब्द नाहीत, रूप नाही, ओळख नाही. जिथे मनाचं नितळपणही गहिरं वाटू लागतं आणि भावना सुद्धा एका अपरिचित उंबरठ्यावरच थबकतात. माझ्या आत जे चाललंय, ते या बाह्य जगाशी काहीच साम्य ठेवत नाही. मन म्हणतं, "थांब", पण आत्मा मात्र चालत राहतो. कारण ही चाल "कुठे जाण्याची" नाही. ही चाल आहे, स्वतःपासून दूर जाण्याची.      सततच्या आशा, अपेक्षा, भावनिक ओढी यामध्ये आपण शांतीचा उल्लेख करतो. पण खरंच, ती या सगळ्यांमध्येच आहे का? की या सगळ्यांपासून "मुक्त" झाल्यावर? जसं झाडावर पानं असतात, पण खऱ्या शांततेसाठी झाडावर काहीही नसलं तरी चालतं, तशीच ही अवस्था. ही शांती म्हणजे नकार नाही, हे काही टाळणं नाही; ही एक अंतःस्वरूपातील निर्मोही ओळख आहे,स्वतःच्याही पलीकडची. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे काळजात खोल जाऊन भिडतो.. "आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्। तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥" (गीता – अध्याय २, श्लोक ७०) अर्थ असा — जसा समुद्र ...

तू पारिजात..भाग ३

तू पारिजात..  श्री कृष्णाच्या अंगणात उमलणारी, रुक्मिणीच्या  संसारात हरवणारी, सत्यभामेच्या अहंकारात जळणारी, आणि तरीही, फक्त त्याच्यासाठीच फुलणारी... मी? मी कदाचित कृष्णाचा रथ असावा, तुला उचलून न्यायला धावणारा, की मीच ती बाग, जिथं तू उगवायचीस, आणि मी फक्त वाट पाहायचो— तू केव्हा पडशील आणि मी तुला उचलून धरिन… तू सुगंधाचा श्वास, आणि मी तो वारा, तू अलगद मिटणारी पापडी, आणि मी तुला हलवणारा स्पर्श... पण अखेरचं सत्य काय माहितेय का? तू जेव्हा पहाटे गळून पडतेस, तेव्हा तुझा गंध तरी कुणासाठी उरत असतो? मी उचलायच्या आतच, तू मातीत मिसळून गेलेली असतेस…!

होळी

 धगधगती ज्वाला उठती, प्रज्वलित त्या फुलत्या, दहन होई सर्व दोष, हर्ष सरे दुःखाच्या! पंचमहाभूते नाचती, मंत्र गजर तो दाटला, रंगांच्या त्या वर्षावाने, आनंद सारा सांडला! धूळवडीच्या सकळ क्षणी, रंग जाहले इंद्रधनू, गुलालाच्या त्या स्पर्शाने, विरघळले सर्व मनू! भाव स्नेह अन् प्रेम गहिरे, हास्य हास्य लय दाटे, जग उजळे रंगोत्सवाने, सुख सिंधू मनी लाटे! शिशिर गेला, वसंत हसला, फुलांवरी ती मोहरली, होळीच्या त्या ज्वाळेमध्ये, काळोखी सारी हरली!